कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर भागात पावसाची संततधार चालू झाल्याने पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात अलमट्टी (कर्नाटक) धरणातून १ लाख ५० सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला होता. आता पाऊस उघडला असल्याने आणि नदीच्या पाण्याची पातळी १५ फुटांवर आल्याने अलमट्टी (कर्नाटक) धरणातून विसर्ग अत्यल्प करण्यात आला आहे. सध्या धरणातून केवळ ६ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. १२३ टी.एम्.सी. क्षमता असणार्या धरणात सध्या ९७.५५ टी.एम्.सी. (७३.३० टक्के) पाणीसाठा आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > अलमट्टी धरणातून केवळ ६ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू !
अलमट्टी धरणातून केवळ ६ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू !
नूतन लेख
- श्री महालक्ष्मीदेवीची सरस्वतीदेवीच्या रूपात केलेली अलंकार पूजा !
- श्री तुळजाभवानीदेवीची ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा !
- पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडा ! – चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
- ईशान्य भारताला कायमचे तोडणे हेच आंतरराष्ट्रीय षड्यंत्र ! – जयवंत कोंडविलकर, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, मुंबई
- मिरज येथील मोहन वनखंडे यांची भाजपला सोडचिठ्ठी !
- शासकीय प्राधिकरणे माहिती अधिकार कायद्यानुसार किती कार्यवाही करतात ? याचे लेखापरीक्षण करावे !