कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी सोडण्याचे प्रकरण !
दायित्वशून्य आणि असंवेदनशील महापालिका प्रशासन ! असे उपोषण का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या समस्या का सोडवत नाही ? – संपादक

सांगली, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगलीत गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी मिसळते. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, तसेच नदीत पोहणार्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी सोडले जाते याच्या निषेधार्थ तसेच यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी यांसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ पाटील यांनी अन्नत्याग उपोषण चालू केले आहे. याला नदी परिसरातील लोकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. (शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी कृष्णा नदीत मिसळू नये यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांना अन्नत्याग उपोषण करावे लागते यापेक्षा प्रशासनासाठी लज्जास्पद काय असू शकते ? – संपादक)
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !