कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी सोडण्याचे प्रकरण !
दायित्वशून्य आणि असंवेदनशील महापालिका प्रशासन ! असे उपोषण का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या समस्या का सोडवत नाही ? – संपादक

सांगली, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगलीत गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी मिसळते. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, तसेच नदीत पोहणार्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी सोडले जाते याच्या निषेधार्थ तसेच यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी यांसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ पाटील यांनी अन्नत्याग उपोषण चालू केले आहे. याला नदी परिसरातील लोकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. (शेरीनाल्याचे पाणी आणि इतर गटारीचे पाणी कृष्णा नदीत मिसळू नये यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांना अन्नत्याग उपोषण करावे लागते यापेक्षा प्रशासनासाठी लज्जास्पद काय असू शकते ? – संपादक)
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !