
१. ‘श्री भवानीदेवीचे आगमनाविषयी कळल्यावर देवीची सेवा करण्याची संधी मिळेल’, असा विचार येणे अन् सेवा मिळाल्याने ‘देवीला मनातले सर्व कळते’, याची अनुभूती येणे

‘रामनाथी आश्रमात भवानीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे’, असे कळल्यावर सर्व साधकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ‘श्री भवानीदेवीचे आगमन होणार आहे’, असे कळल्यावर ‘आता देवीच्या आगमनाच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’चा वेगळा रंगीत अंक निघेल आणि मला सेवा करण्याची संधी मिळेल’, असा विचार माझ्या मनात आला. मला त्या अंकात विज्ञापने सिद्ध करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली. यासाठी मला कृतज्ञता वाटली. ‘देवीला मनातले सर्व कळते’, याची मला अनुभूती आली. प्रत्यक्ष देवीनेच माझ्या मनातील इच्छा पूर्ण केल्याने देवीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून देवीच सर्व विधी करत आहे’, असे जाणवणे
२१.१.२०२० या दिवशी भवानीमातेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीचे पूजन करण्यासाठी बसल्या होत्या. त्या वेळी ‘साक्षात् देवीच देवीच्या मूर्तीसमोर बसली आहे’, असे मला वाटत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई प्रतिष्ठापना करतांना देवीच्या प्रत्येक अवयवावर दर्भ लावत होत्या. त्या वेळी ‘साक्षात् देवीच आपले तत्त्व मूर्तीमध्ये प्रक्षेपित करत आहे’, असे मला वाटले. ‘तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई नसून त्यांच्या माध्यमातून देवीच आहे आणि सर्व विधी देवीच करत आहे’, असे मला वाटले.
३. प्रतिष्ठापनेचा विधी करतांना भवानीमातेच्या मूर्तीमध्ये पुष्कळ जिवंतपणा आल्याचे जाणवले. ‘स्वतः देवीच सगुण रूपात आली आहे’, असे मला वाटले.
४. आरतीच्या वेळी उपस्थित रहाता न येणे आणि सहसाधकाने आरती करतांना आलेले अनुभव सांगितल्यावर ‘स्वतःही आरतीत सहभागी झालो आहे’, असे जाणवणे
संध्याकाळी आरतीच्या वेळी मी सेवेमुळे आरतीला जाऊ शकलो नाही. त्या वेळी मला एका साधकाने देवीची आरती करतांना आलेले अनुभव सांगितले. तेव्हा ‘मीसुद्धा आरतीमध्ये सहभागी झालो आहे’, असे मला वाटले.
५. सूक्ष्मातून भावप्रयोग करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवीसमोर कृतज्ञताभावात उभे राहून ‘सर्व साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती करवून घे’, असे तिला सांगितल्याचे साधकाला दिसणे, ते पाहून साधकाचा कृतज्ञताभाव दाटून येणे
मी पुढीलप्रमाणे सूक्ष्मातून भावप्रयोग केला, ‘मी आरतीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेलो आहे. तेथे देवीसमोर परात्पर गुरु डॉक्टर उभे आहेत. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू येत आहेत. ते देवीला सांगत आहेत, ‘हे भवानीदेवी, तू आश्रमात सर्व साधकांचा उद्धार करण्यासाठी आली आहेस. तू आल्याने हिंदु राष्ट्र स्थापण्याचा मार्ग सोपा झाला आहे. तुझ्या येण्याने हिंदु राष्ट्र होण्याचे कार्य अधिक सोपे झाले आहे. तूच आता सर्व साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती करवून घे.’ त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत आणि मी ते अश्रू एका पात्रामध्ये गोळा करत आहे. ते पात्र भरल्यावर मी ते पाणी देवीच्या चरणांवर घालत आहे.’ तेव्हा माझा कृतज्ञताभाव दाटून आला. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचा कृतज्ञताभाव पाहून ‘आपण कृतज्ञताभावात रहायला किती न्यून पडतो ?’, असे मला वाटले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.
हे सर्व भवानीदेवी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामुळेच अनुभवता आले. त्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२०)
|
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !