जत (जिल्हा सांगली) – तालुक्यातील मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिराच्या परिसरात पत्रा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला, तर १३ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी उमदी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चौघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. (भ्रष्टाचारी आणि निष्काळजी लोकांमुळे निष्पाप भाविकांचा प्राण जाणे, हे संतापजनक ! – संपादक)
१२ मेच्या सायंकाळी ५ च्या सुमारास मंदिरात आश्रयाला थांबलेल्या भाविकांवर भिंत कोसळली. वादळी वार्यामुळे शेड कोसळली असली, तरी त्यामागे निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि तांत्रिक चुका असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. कोंडिबा केसकर, आप्पासो केसकर, सुनील जावीर आणि किसन यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०६, १२५ आणि १२५ (ब) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !