
‘कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था आणि त्याचे भविष्य शिक्षणक्षेत्रातील पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. सध्या भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा संरचनात्मक पालट दिसून येत आहे. नीती आयोगाच्या अलीकडील अहवालानुसार गेल्या २ दशकांत भारतीय पालकांचा कल सरकारी शाळांऐवजी खासगी शाळांकडे झपाट्याने वाढला आहे; मात्र शिक्षणक्षेत्रातील खासगी क्षेत्राच्या या वेगवान वाढीमुळे गुणवत्ता, समानता आणि नियमन यांसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे यात म्हटले आहे. नीती आयोगाच्या अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या २ दशकांत सरकारी शाळांमधील प्रवेशांमध्ये मोठी घट झाली आहे. वर्ष २००५ मध्ये जिथे ७१ टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकत होते, तिथे वर्ष २०२४-२५ मध्ये हा आकडा घसरून केवळ ४९.२४ टक्क्यांवर आला आहे. याउलट आता माध्यमिक शिक्षणाच्या स्तरावर ४४.०१ टक्के संस्था खासगी शाळांच्या रूपात कार्यरत आहेत.’ (९.५.२०२६)
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !