सनातनच्या ग्रंथांमध्ये विविध आध्यात्मिक ग्रंथांमधील लिखाण अंतर्भूत करण्याचे कारण 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘विविध लेखकांनी लिहिलेल्या आध्यात्मिक विषयांच्या संदर्भातील पुस्तकांमध्ये काही भाग सामायिक असतो, तर काही भाग वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिज्ञासूंना हा वैशिष्ट्यपूर्ण भाग शोधण्यासाठी अनेक ग्रंथ वाचावे लागू नयेत अन् त्यांना एकाच ठिकाणी हे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण एकत्रित मिळावे, या उद्देशाने सनातनच्या ग्रंथांमध्ये विविध आध्यात्मिक ग्रंथांमधील लिखाण अंतर्भूत केलेले असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


तरुणपणी आणि म्हातारपणी असलेला साधनेचा आधार

‘तरुणपणी अज्ञानामुळे वागण्या-बोलण्यात तोल जातो आणि म्हातारपणी वार्धक्यामुळे उभे राहिल्यावर तोल जातो. साधनेचा आधार असल्यास देव सगळे सांभाळून घेतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले


आजारपण नाही, तर म्हातारपण !

‘वय झाले की भूक न लागणे, ‘काही करू नये, केवळ विश्रांती घ्यावी, असे वाटणे’ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे कोणत्याही आजाराची नसून ती वृद्धत्वाची आहेत. त्यामुळे औषधामुळे त्याच्यात फरक पडेल, याची अपेक्षा न ठेवता अधिकाधिक नामजप करावा. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले