मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल या दिवशी पार पडले. दुपारी ३ वाजेपर्यंत रामटेक येथे ५२.३८, नागपूर येथे ४७.९१, भंडारा-गोंदिया ५६.८७, गडचिरोरीली-चिमूर ६४.९५, तर चंद्रपूर येथे ५५.११ टक्के मतदान झाले. नागपूर येथे काही मतदारांची नावे मतदानसूचीत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. सद्य:स्थितीमध्ये नागपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या ३ मतदारसंघांत भाजपचे खासदार आहेत. रामटेकमध्ये शिवसेना, तर चंद्रपूर येथे काँग्रेसचे खासदार आहेत. गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले, तर उर्वरित ४ लोकसभा मतदारसंघांत सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. राज्यात मतदानाच्या वेळी कोणतीही अनुचित घटनेची नोंद नाही.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > महाराष्ट्रात लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान ५४.८५ टक्के !
महाराष्ट्रात लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान ५४.८५ टक्के !
नूतन लेख
पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
संपूर्ण जगाला तारणार्या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा
महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला