
पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये. गेली ७० वर्षे बहुतांशी ब्राह्मण समाज भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा होता; मात्र सातत्याने खोटे बोलून समाजाला फसवण्याच्या पलीकडे त्यांना काहीही दिले नाही. त्यामुळे अस्वस्थ समाज शिवसेनेकडे वळत असल्याचे शिवसेनेने पत्रकात म्हटले आहे. मागच्या सरकारने ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य व्हावी म्हणून अमृत नावाने महामंडळ प्रस्थापित केले होते; मात्र महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा प्रस्ताव बारगळला अशी खोटी माहिती चंद्रकांत पाटील ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींना भेटून पसरवत आहेत, असा आरोप शिवसेनेने पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !