
पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये. गेली ७० वर्षे बहुतांशी ब्राह्मण समाज भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा होता; मात्र सातत्याने खोटे बोलून समाजाला फसवण्याच्या पलीकडे त्यांना काहीही दिले नाही. त्यामुळे अस्वस्थ समाज शिवसेनेकडे वळत असल्याचे शिवसेनेने पत्रकात म्हटले आहे. मागच्या सरकारने ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य व्हावी म्हणून अमृत नावाने महामंडळ प्रस्थापित केले होते; मात्र महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा प्रस्ताव बारगळला अशी खोटी माहिती चंद्रकांत पाटील ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींना भेटून पसरवत आहेत, असा आरोप शिवसेनेने पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान