२६ मेच्या आक्रमणात ४५ लोक झाले होते ठार !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायली संरक्षण दलांनी २१ जूनला गाझाच्या दक्षिणेला असलेल्या राफाह शहरावर आक्रमण केले. यांतर्गत शहराबाहेर ‘अल्-मवासी’ येथील पॅलेस्टिनी लोकांच्या निर्वासित छावण्यांवर बाँबस्फोट करण्यात आले. यात २५ जण ठार, तर ५० जण घायाळ झाले. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने या आक्रमणाची माहिती दिली; परंतु इस्रायल संरक्षण दलाकडून आक्रमण केल्याचे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. आतंकवादी लोकवस्त्यांमधून आतंकवादी कारवाया करतात’, असे इस्रायल नेहमीच सांगत आला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे लाखो लोक या भागातून आधीच पळून गेले आहेत. याआधी २६ मे या दिवशीही इस्रायलने राफाह शरणार्थी छावणीवर हवाई आक्रमण केले होते. यामध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते. यानंतर इस्रायलद्वेष्ट्यांकडून ‘#AllEyesOnRafah’ (जगाचे लक्ष राफाहवर) हा हॅशटॅग वापरून इस्रायलला लक्ष्य करण्यात आले. याला भारतातील पुरो(अधो) गामी जमातीनेही उचलून धरले होते.
युद्धात आतापर्यंत ३७ सहस्र लोकांचा मृत्यू !
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ७ ऑक्टोबर २०२३ पासून चालू आहे. हमासच्या आतंकवाद्यांनी १ सहस्र २०० इस्रायली नागरिकांना ठार मारून २३४ जणांचे अपहरण केले होते. त्यानंतर झालेल्या युद्धात आतापर्यंत ३७ सहस्र १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.

भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक