कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !

पंढरपूर – येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दर्शन घेऊन राज्यात भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली आणि हवामान खात्याचे अंदाज चुकीचे ठरून बळीराजाला दिलासा मिळावा, असे साकडे त्यांनी श्री विठ्ठल चरणी घातले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे, दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि मंदिर समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

या वेळी पत्रकारांशी बोलतांना दत्तात्रय भरणे यांनी राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. शेतकरी आणि नागरिक यांनी अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण इंधनसाठा करू नये, आवश्यकतेनुसारच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.