सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही ! 

‘परमार्थ साधण्यात आई-वडील, व्याही, जावई इत्यादीही साहाय्य करत नाहीत. मनुष्याने स्वतःच स्वतःसाठी साहाय्य शोधले पाहिजे. परमार्थाच्या प्राप्तीत समर्थ सद्गुरुच साहाय्य करण्यात सक्षम आहेत. तेच आपले आत्मकल्याण करतात. संत एकनाथ म्हणतात, ‘सद्गुरुंशी एकरूप झाल्याविना आपण त्यांच्या चरणी शरण जाऊ शकत नाही, म्हणजेच परमात्मप्राप्ती होऊ शकत नाही. – संत श्री एकनाथ महाराज