साधकांनो, मनात येणार्या अहंयुक्त विचारांमुळे साधनेत होणारी हानी लक्षात घेऊन ते घालवण्यासाठी अंतर्मुखतेने कठोर प्रयत्न करा !
उत्तरदायी साधकांनी प्रेमाने आणि सहजतेने बोलावे, या अपेक्षेची पूर्तता न झाल्याने साधकांवर मनाला नकारात्मकता येणे, पूर्वग्रह निर्माण होऊन मनाचा संघर्ष होणे, बहिर्मुखता वाढणे इत्यादी परिणाम होत असल्याचे लक्षात येते.