
जत (जिल्हा सांगली), ७ डिसेंबर (वार्ता.) – दुष्काळी परिस्थितीमुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जत तालुक्यातील ५० सहस्र ऊसतोड कामगारांनी स्थलांतर केले आहे. २० एकर शेती असलेला शेतकरी ऊसतोड कामगार आहे. दुष्काळजन्य परिस्थिती मुळे आष्टा, भिलवडी, सांगली, वाळवा, कर्नाटक राज्य या ठिकाणी अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. जत तालुक्यात कामगारांच्या कामासाठी एकही मोठा उद्योग नाही. तरुण बेरोजगारांची संख्याही अधिक आहे.
जत साखर कारखाना राजकीय स्पर्धेत बंद पडल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकासह कामगार आणि सभासद यांची मोठी हानी झाली आहे. ऊसतोड कामगार शासनाच्या अनेक सोयी-सुविधा यांपासून वंचित आहे. ऊसतोड कामगारांना मजुरी वाढवून दिली जात नाही. ‘ऊसतोड कामगार महामंडळा’ची घोषणा हवेतच विरली आहे. या महामंडळात आरोग्य विमा, आरोग्य सेवा, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शाळेची व्यवस्था इत्यादी गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
याविषयी जत येथील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘आमचा १ क्रमांकाचा शत्रू दुष्काळ आहे. त्याला हद्दपार करायचे आहे. त्याचसमवेत आमचा दुसरा शत्रू माता-भगिनींच्या हातातील उसाचा कोयता आहे. तो आम्हाला हद्दपार करायचा आहे. यासाठी मला जतच्या जनतेने निवडून दिले आहे. ऊसतोड कामगारांची संख्या अल्प करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेच्या जत तालुक्यातील कामांना गती देणार आहे.’’
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली