
जत (जिल्हा सांगली), ७ डिसेंबर (वार्ता.) – दुष्काळी परिस्थितीमुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जत तालुक्यातील ५० सहस्र ऊसतोड कामगारांनी स्थलांतर केले आहे. २० एकर शेती असलेला शेतकरी ऊसतोड कामगार आहे. दुष्काळजन्य परिस्थिती मुळे आष्टा, भिलवडी, सांगली, वाळवा, कर्नाटक राज्य या ठिकाणी अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. जत तालुक्यात कामगारांच्या कामासाठी एकही मोठा उद्योग नाही. तरुण बेरोजगारांची संख्याही अधिक आहे.
जत साखर कारखाना राजकीय स्पर्धेत बंद पडल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकासह कामगार आणि सभासद यांची मोठी हानी झाली आहे. ऊसतोड कामगार शासनाच्या अनेक सोयी-सुविधा यांपासून वंचित आहे. ऊसतोड कामगारांना मजुरी वाढवून दिली जात नाही. ‘ऊसतोड कामगार महामंडळा’ची घोषणा हवेतच विरली आहे. या महामंडळात आरोग्य विमा, आरोग्य सेवा, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शाळेची व्यवस्था इत्यादी गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
याविषयी जत येथील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘आमचा १ क्रमांकाचा शत्रू दुष्काळ आहे. त्याला हद्दपार करायचे आहे. त्याचसमवेत आमचा दुसरा शत्रू माता-भगिनींच्या हातातील उसाचा कोयता आहे. तो आम्हाला हद्दपार करायचा आहे. यासाठी मला जतच्या जनतेने निवडून दिले आहे. ऊसतोड कामगारांची संख्या अल्प करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेच्या जत तालुक्यातील कामांना गती देणार आहे.’’
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !