कोल्हापूर, १४ ऑगस्ट (वार्ता.) – गेल्या ३ दिवसांपासून पाऊस अल्प झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे १३ ऑगस्टला रात्री बंद झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अल्प होईल. आलमट्टीतून २ लाख २५ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येत आहे. वारणा धरणातून सध्या ५ सहस्र ५०० घनफूट प्रतिसेकंद, तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून ११ सहस्र ९५७ घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. सांगली येथे कृष्णा नदीची पातळी २८ फूट ६ इंच इतकी नोंदवली गेली.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद
नूतन लेख
- कर्तव्यतत्पर वीज कर्मचार्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने सत्कार !
- पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ !
- अयोध्येवर नैसर्गिक संकटे येत नव्हती ! – श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी
- नाशिक लोकसभा लढवण्यावर श्री शांतिगिरी महाराज ठाम !
- सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने कोल्हापूर येथे रामराज्य संकल्प यज्ञ !
- कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !