आळंदी (पुणे) – येथील ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ने वर्ष २०२६ च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भात महत्त्वाचे पालट घोषित केले आहेत. पूर्वी घोषित केल्याप्रमाणे १३ एप्रिलला पालखी सोहळ्याचे वेळापत्रक येणार होते. ९ आणि १० एप्रिलला पुणे येथील भवानी पेठ येथील पालखी विठ्ठल मंदिरातील मुक्काम, तसेच सुविधा अन् नियोजनाविषयी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विश्वस्त यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव निश्चित झालेला नसल्यामुळे संस्थान कमिटीने या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही. याविषयी पुढील ८ दिवसांत प्रशासनासमवेत बैठक आयोजित होणार असून सुधारित आराखडा निश्चित झाल्यानंतर २६ एप्रिलला दिंडी समाजासाठी सुधारित मार्ग घोषित केला जाणार आहे, तसेच १ मे या दिवशी आळंदी येथे आषाढी वारीची अधिकृत कार्यक्रम पत्रिका घोषित करण्यात येणार आहे.

दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली