ग्रंथमालिका : मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धकर्म

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !

नवरात्रोत्सवानिमित्त प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचे प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

जेवण जास्त झाल्याने होणार्‍या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात.

चूक आणि सुधारणा

२८ ऑगस्ट २०२२ या दिवशीच्या ‘श्री सिद्धिविनायक विशेषांका’त पृष्ठ ६ वर ‘श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातील ‘५ उ. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’ यांचा अर्थ’ यातील देशकाल आणि संकल्प चुकीचा प्रसिद्ध झाला आहे. या चुकीसाठी क्षमस्व ! उत्तरदायी कार्यकर्ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घेत आहेत.

आजचा वाढदिवस : चि. संस्कृती खांदेल

भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी यवतमाळ येथील चि. संस्कृती मंगेश खांदेल हिचा २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

आजचा वाढदिवस : कु. सिद्धी बाबते

भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी संभाजीनगर येथील हिचा १२ वा वाढदिवस आहे. कु. सिद्धी बाबते हिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

‘सेंद्रिय शेती’ म्हणजे ‘नैसर्गिक शेती’ नव्हे !

नैसर्गिक शेतीमध्ये झाडांसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणूंचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येतो. या पद्धतीमध्ये खर्च नगण्य आणि उत्पन्न भरपूर असते. यासाठी सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेमध्ये नैसर्गिक शेतीविषयीची माहिती दिली जाते.

आजचा वाढदिवस : सौ. विजया भिडे

भाद्रपद शुक्ल तृतीया, म्हणजे हरितालिका (३०.८.२०२२) या दिवशी पुणे येथील सौ. विजया मिलिंद भिडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा ६० वा  वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

देश स्वतंत्र झाला, तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ला साजरा करा !