सज्जन आणि दुर्जन यांचा स्वभाव
सज्जन पुरुष नारळासारखे दिसतात, अर्थात् वरून कठोर आणि आतून कोमल (मृदू) अन् गोड ! दुर्जन लोक बोरासारखे फक्त बाहेरूनच मनोहर असतात. (आतून कठोर हृदयाचे असतात.)
सज्जन पुरुष नारळासारखे दिसतात, अर्थात् वरून कठोर आणि आतून कोमल (मृदू) अन् गोड ! दुर्जन लोक बोरासारखे फक्त बाहेरूनच मनोहर असतात. (आतून कठोर हृदयाचे असतात.)
‘आज समाज दुःखी, नीरस जीवन जगत आहे. जर समाजाला खरे सुख-शांती, आनंद पाहिजे असेल, तर सत्संग-आयोजनांची आज अत्यंत आवश्यकता आहे.’
‘बलवान तोच उत्तम आहे, जो निर्बलांची, असाहाय्यांचे साहाय्य करण्यात शूर असेल, ज्याच्यापासून आळस आणि भय सर्वथा दूर असेल, संयम ज्याच्या समवेत असेल आणि इंद्रियरूपी घोड्यांचा मनरूपी लगाम ज्याच्या हातात असेल; यासह जो बुद्धीमान आणि निरभिमानी असेल.
देवाने आपल्याला दिलेले तन, मन आणि धन यांतील शक्य तितका भाग आपण देवाला अर्पण केला, म्हणजे शरिराने सेवा, मनाने नामजप आणि धनाचा त्याग केला, तर त्यातून आपली पाप-पुण्याच्या पलीकडील साधना होते.
‘ज्याच्यात आसक्ती किंवा द्वेष असतो, तो सत्याचे निरूपण करू शकत नाही; कारण ती आसक्ती त्याच्या ज्ञानाशी जुळून जाते. अशा स्थितीत तो स्वतःविषयी किंवा दुसर्याविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
‘संत कबीर यांनी म्हटले आहे की, अशा संतांचे वा सद़्गुरूंचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्य करावे.’
हे बंधू ! लोखंडाला लागलेल्या गंजासमान पापी जीव सोन्यासमान शुद्ध झाले आहेत; कारण भगवंताने त्यांना सद़्गुरुरूपी परिसाचा स्पर्श करवून दिला आहे (सद़्गुरूंची भेट घालून दिली आहे).
आपले कर्म, आपले बोलणे आणि आपले व्यवहार यांत तुम्ही उद्देश आणि आश्रय ईश्वराचा ठेवला, तर तुमचे जीवन सत्-चित्-आनंद स्वरूप परमात्म्याशी भेट घालून देणारे होईल.
लोक मथुरा, काशी आणि द्वारका या यात्रा करत आहेत. ६८ तीर्थांमध्ये स्नान करत आहेत; परंतु सद़्गुरूंविना कोणताही मनुष्य आत्मा-परमात्म्याचा शोध घेऊ शकला नाही, उलट वारंवार भवसागरात गटांगळ्या खात आहे.
भलेही हा देह सुटो; पण गुरुचरणी माझा भाव दृढ राहील. माझ्यावर शिळा येऊन कोसळल्या, तरीही मी गुरुचरण कधीच सोडणार नाही. (संत एकनाथ महाराज म्हणतात की, ज्याच्या हृदयात सद़्गुरूंप्रती अशी दृढ निष्ठा, माधुर्य आहे, तेथेच विश्वंभर प्रगट होतात.’