शास्‍त्रानुकूल आचरणाचे फळ कोणते ?

‘शास्‍त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्‍ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्‍य येईल. सत्‍संगाचे, शास्‍त्र अध्‍यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्‍य येत नसेल, तर तुम्‍ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्‍त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही.

सुभाषिते

केवळ दुसर्‍यांचे कल्‍याण करण्‍याच्‍या विचारानेच हृदयात सिंहासमान बळ येते. तुमच्‍यात जी योग्‍यता आहे, तिला ‘बहुजनहिताय’ (सर्वांच्‍या हितासाठी) खर्च करा (वापरा). त्‍यामुळे तुम्‍ही सुयोग्‍य बनाल…..

‘आजची साधना उद्या करणे’, हे काही वेळा अपरिहार्य असते !

‘कधीतरी एखाद्या दिवशी कामाच्‍या घाईगर्दीत साधनेस वेळ मिळाला नाही, उदा. साधनेच्‍या वेळी कुणी अकस्‍मात् आजारी पडला, तर त्‍याला डॉक्‍टरांकडे न्‍यावे लागते. तेव्‍हा ‘आजची साधना उद्या करणे’, हे अपरिहार्य असते.’

ध्‍यान आणि जप एकमेकांचे परिपोषक आहेत !

जपाविना ध्‍यान होत नाही. ध्‍यान ठीक केल्‍याविना जप होणार नाही; म्‍हणून जप करतांना ध्‍यान लावाल, तेव्‍हाच जप ठीक होईल आणि जप ठीक होईल

अमृतबिंदू

‘आसक्‍ती मोठी दुर्जय आहे; परंतु तीच आसक्‍ती जर भगवंतात, भगवंताच्‍या लाडक्‍या ब्रह्मवेत्ता संतांमध्‍ये आणि भगवंताच्‍या नामात होते, तेव्‍हा ती सर्व दुःख मिटवून स्‍वतःला परम सुखरूप बनवते.’

सुखासाठी बाहेर भटकू नको, आनंद तुझा आत्‍मा आहे !

‘आनंद तुझा आत्‍मा आहे, प्रसन्‍नता तुझा आत्‍मा आहे, गुरुकृपा तुझ्‍या समवेत आहे आणि तरीही तू सुखासाठी बाहेर भटकतो ! कुठपर्यंत ? आपल्‍या खर्‍या घरात ये. शरिराचे घर तर चार भिंतींचे आहे आणि तुझे घर तर हृदयेश्‍वराचे द्वार आहे !’

श्रीहरि स्‍मरणाने दुःखे दूर होतात

‘जसे सूर्योदय होताच रात्र पळून जाते, सिंहाची गर्जना ऐकताच हत्तीला भीती वाटते, तसेच हरिभक्‍त समोर येताच संकटे पळून जातात. त्‍यांच्‍या दृष्‍टीच्‍या समोर येतच नाहीत. जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्य्र दूर होते, तसेच (सर्वव्‍यापक, सर्वांचे अंतरात्‍मा) श्रीहरीचे स्‍मरण केल्‍याने जन्‍म-मरणरूपी दुःख दूर होते.’

पुष्‍कळ सोपे आहे र्‍हास थांबवून स्‍वतःचा विकास करणे !

‘व्‍यर्थ चिंतनाचा त्‍याग करावा. व्‍यर्थ चिंतन हटवण्‍यासाठी अधूनमधून ‘ॐ’काराचे उच्‍चारण, स्‍मरण करावे. व्‍यर्थ चिंतनाने शक्‍तीचा र्‍हास होतो, विवंचना होत रहाते. त्‍यात बरीच शक्‍ती खर्च होते. भगवद़्-उच्‍चारण, स्‍मरण याने व्‍यर्थ चिंतनाचा अंत होतो.