

१. सौ. अनिता घाळीकाकूंच्या निधनानंतर आम्ही त्यांचे पती श्री. प्रकाश घाळीकाका (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना भेटलो. तेव्हा ते पुष्कळ स्थिर होते.
२. मी कन्नड लिखाणाचे मराठीत भाषांतर करण्याची सेवा करते. मी केलेली सेवा काका पडताळतात. ते त्या सेवेविषयीच माझ्याशी बोलत होते.
३. थोड्या वेळाने त्यांनी ‘तुम्हाला पाणी हवे का ?’, असे आम्हाला विचारले. त्याही परिस्थितीत ते इतरांची काळजी घेत होते.
– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२२)
सौ. घाळीकाकूंचे अंत्यविधी झाल्यानंतर श्री. घाळीकाकांनी लगेच सेवेला प्रारंभ करणे
‘सौ. घाळी काकूंचे सर्व अंत्यविधी झाल्यानंतर त्याच दिवशी श्री. घाळी काकांनी सेवेला आरंभ केला’, असे मला वाटते; कारण मी भाषांतरित केलेली संगणकीय धारिका पडताळून १४.४.२०२२ या दिवशी रात्री १०.३० वाजता त्यांनी मला पाठवली होती. त्यावरून ‘काका किती स्थिर आहेत आणि याही स्थितीत त्यांना गुरुकार्याची किती तळमळ आहे !’, हे माझ्या लक्षात आले.
– सौ. सुजाता अशोक रेणक
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !