
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात नाममात्र भाड्याने दिलेल्या मालमत्ता पुन्हा नगरपालिकेच्या कह्यात घेण्याचा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी वैध ठरवला आहे. नगराध्यक्षांच्या या निर्णयांना आव्हान देणारे अपील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे प्रविष्ट केले होते. हे अपील जिल्हाधिकार्यांनी फेटाळले आहे. हा निकाल म्हणजे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कारभार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला चपराक आहे, असे मत विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी व्यक्त केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाला योग्य तेथे आव्हान दिले जाईल, असे सांगितले.
यापूर्वी पालिकेत जयंत पाटील यांची सत्ता असतांना तत्कालीन सत्ताधार्यांनी विविध मालमत्ता नाममात्र भाड्याने देण्याचा ठराव केला होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. यानंतर संबंधित इमारती नगरपालिका कह्यात घेण्याचा ठराव नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी संमत केला होता. याकामी विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !