मुसलमान दंगलखोरांच्या अनधिकृत घरांवर कारवाई केल्याचे प्रकरण

नवी देहली – उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या बुलडोझर कारवाईच्या विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी महाधिवक्ता (सॉलिसिटर जनरल) तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडताना ही कारवाई योग्य ठरवली, तर याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता सी.यू. सिंह यांनी त्यावर स्थगिती आणण्याची मागणी केली. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला अनधिकृत बांधकामे हटवतांना कायद्याच्या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने या प्रकरणी उत्तरप्रदेश सरकार, तसेच प्रयागराज आणि कानपूर विकास प्राधिकरण यांच्याकडून ३ दिवसांत उत्तर मागितले आहे. आता या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
यूपी में बुलडोजर पर फिलहाल रोक नहीं, Jamiat Ulema-e-Hind की याचिका पर सुप्रीम कोर्ट ने जारी किया नोटिस
देखिए @Sehgal_Nipun की ये रिपोर्ट https://t.co/3huLgLyPTJ#Bulldozer #SupremeCourt #UttarPradesh pic.twitter.com/u6he9JiNB9
— ABP News (@ABPNews) June 16, 2022
महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितले की, उत्तरप्रदेश सरकारने यापूर्वीच संबंधितांना नोटीस दिली होती. कुणावरही चुकीची कारवाई झाली नाही. सरकार कुठल्याही विशिष्ट समाजाला लक्ष्य करत नाही !
घरे २० वर्षांहून अधिक काळ उभी आहेत ! – आंदोलकांचे अधिवक्तायाचिकाकर्त्यांच्या वतीने यक्तीवाद करतांना अधिवक्ता सिंह म्हणाले की, हिंसाचारात सहभागी असलेल्या आंदोलकांवर कारवाई म्हणून विद्ध्वंस केला जात आहे. पुन्हा पुन्हा होणारा विद्ध्वंस धक्कादायक आणि भयावह आहे. ही घरे २० वर्षांहून अधिक काळ उभी आहेत आणि काही वेळा ती आरोपींची नसून त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची आहेत. (यामुळे दंगलखोरांची घरे अधिकृत होतात, असा त्याचा अर्थ होत नाही. मुळात अनधिकृत घरांना अधिकृत ठरवण्याचा हा प्रयत्नच निषेधार्ह आहे. सरकारने अशा सर्वांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक) |
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’