
आळंदी (जिल्हा पुणे) – येथे ३० जुलैला सायंकाळी सवा ६ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी नगर परिषद चौकात माऊलींच्या जयघोषात, वरुणराजाच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झाले. नगर परिषदेच्या वतीने माऊलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
माऊलींच्या पालखी स्वागतासाठी आळंदीतील वारकरी संप्रदायातील सहस्रो विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगासह ठिकठिकाणी उपस्थिती दर्शवली होती. परतीच्या या वारीत माऊलींच्या आगमनानिमित्त अनेक महिला आणि पुरुष, तसेच वारकरी विद्यार्थी फुगडी खेळतांना दिसत होते, तसेच या वारीतील भाविक हरिनामाच्या गजरात दंग झाले होते. आळंदी शहरात वारकरी भाविकांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. अनेक नागरिक या आगमनाच्या कार्यक्रमात सहभागी होते.
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !