
आळंदी (जिल्हा पुणे) – येथे ३० जुलैला सायंकाळी सवा ६ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी नगर परिषद चौकात माऊलींच्या जयघोषात, वरुणराजाच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झाले. नगर परिषदेच्या वतीने माऊलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
माऊलींच्या पालखी स्वागतासाठी आळंदीतील वारकरी संप्रदायातील सहस्रो विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगासह ठिकठिकाणी उपस्थिती दर्शवली होती. परतीच्या या वारीत माऊलींच्या आगमनानिमित्त अनेक महिला आणि पुरुष, तसेच वारकरी विद्यार्थी फुगडी खेळतांना दिसत होते, तसेच या वारीतील भाविक हरिनामाच्या गजरात दंग झाले होते. आळंदी शहरात वारकरी भाविकांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. अनेक नागरिक या आगमनाच्या कार्यक्रमात सहभागी होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !