![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/05/30161755/fadanvis-avhad.jpg)
मुंबई – मनुस्मृतीमधील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याविषयीची चर्चा जितेंद्र आव्हाड यांनीच चालू केली. त्यांनीच आंदोलन केले आणि खोटे आंदोलन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र फाडलेे; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. काशी येथे पत्रकारांनी महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान, यांविषयी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करण्याविषयी सरकारमध्ये कुठहीही चर्चा झालेली नाही. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक घेण्याचा सरकारमधील कुणाचा विचारही नाही.’’