यवतमाळ येथे अपघातामुळे ६ गोवंशियांची तस्करी उघड !

चालकाचे पलायन !

प्रतिकात्मक चित्र

यवतमाळ, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील आर्णी मार्गावरील भांबराजा पथकर नाक्याजवळ चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याचे समजले. पोलिसांनी पडताळणी केल्यावर ६ गोवंशियांची तस्करी होत असल्याचे उघड झाले. संबंधित वाहनातून ६ गोवंशियांना दाटीवाटीने बांधून नेण्यात येत होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार अपघात होताच चालक वाहन सोडून पळून गेला. यातील गोवंशियांना मोक्ष गोसंवर्धन केंद्र, यवतमाळ येथे पाठवण्यात आले. त्यानंतर वाहन जप्त करण्यात आले. पुढील अन्वेषण ग्रामीण पोलीस करत आहे.

संपादकीय भूमिका :

गोवंशहत्या बंदी कायदा असतांनाही होणार्‍या गोतस्करीच्या घटना गोवंशियांचे हत्यारे उद्दाम झाल्याचे दर्शवतात !