
मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने १ डिसेंबरपासून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमती देण्यात आली आहे. सध्या शहरी भागात ८ वी ते १२ वी आणि ग्रामीण भागात ५ वी ते १२ वीचे वर्ग चालू आहेत. राज्यात प्राथमिक शाळा चालू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि निवासी शाळा चालू करता येतील, असे कोरोनाविषयीच्या ‘टास्क फोर्स’ने राज्य सरकारला सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ग्रामीण भागासह शहरी भागात १ ली ते १२ वीच्या शाळा चालू करण्यात येणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा प्रयत्न करू. शाळांनीही विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घ्यावी.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध