नाशिक – आई अभ्यास करण्यासाठी रागावते आणि मैत्रिणींना भेटू देत नाही, याचा राग मनात धरून एका शाळेतील ३ अल्पवयीन मुली घर सोडून गेल्या. अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला; पण पोलिसांनी ८ घंट्यांत त्या मुलींना शोधून काढले. (सध्याच्या पिढीमध्ये संयमच राहिला नसल्याचे दर्शवणारे उदाहरण ! – संपादक) मुली नाशिक रोड स्थानकातून जळगावकडे जाणार्या गाडीत बसल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसले. पोलिसांनी जळगाव रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण पाहिल्यावर त्यात मुली जळगावहून पुन्हा मुंबईकडे जाणार्या गाडीत बसल्याचे दिसले. मुलींनी कल्याण रेल्वे स्थानकावरील प्रवाशाच्या भ्रमणभाषवरून त्यांच्या मैत्रिणीला संपर्क केला. पोलिसांनी भ्रमणभाषचे लोकेशन पडताळल्यावर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील असल्याचे समजले. पोलिसांनी कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क करून त्या मुलींना कह्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोर उपस्थित केले आणि नंतर पालकांकडे सोपवले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > क्षुल्लक कारणावरून ३ अल्पवयीन मुलींचे घरातून पलायन !
क्षुल्लक कारणावरून ३ अल्पवयीन मुलींचे घरातून पलायन !
नूतन लेख
- मुंबई-पुणे यांच्यातील ‘मिसिंग लिंक’ मार्गाचे काम अंतिम टप्प्यात !
- शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
- पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त होणार !
- मालेगाव येथे सकल हिंदु समाजाकडून निवेदन !
- केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पुण्यातून १० जणांना अटक
- थोडक्यात महत्त्वाचे : धर्मांधांकडून बनावट १२५ किलो तूप आणि ३० किलो लोणी जप्त… ११ वर्षीय मुलाला चिरडले !….