लवकरच मुसलमान भारतावर राज्य करतील !  

बांगलादेशातील इस्लामी संघटनेच्या नेत्याची गरळओक

अमीर अल्लामा शाह मुहिबुल्ला बाबुनगरी

ढाका (बांगलादेश) – भारतातील भाजपच्या प्रवक्त्याने महंमद पैगंबर आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याने भारताच्या पतनाला वेग आला आहे. हा ‘गजवा-ए- हिंद’चा (भारताच्या विनाशाचा) अंदाज आहे. लवकरच भारत मुसलमानांच्या  अधिपत्याखाली येईल, असे विधान ‘हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेश’चे अमीर अल्लामा शाह मुहिबुल्ला बाबुनगरी यांनी केले. पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या निषेधार्थ चटगाव येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

मुसलमान जागे झाले, तर कट्टर हिंदू भारतात राहू शकणार नाहीत !

ते पुढे म्हणाले की, भारतात मोदी सत्तेत आल्यापासून ते इस्लामवर एकामागून एक आक्रमणे करत आहेत. भारतात हिंदूंची सत्ता फार काळ टिकणार नाही. मुसलमान जागे झाले, तर कट्टर हिंदू भारतात राहू शकणार नाहीत.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंचा एक तरी नेता ‘इस्लामी देशांवर हिंदू राज्य करतील’, असे बोलण्याचे धाडस आणि प्रत्यक्षात तसे करण्यासाठी कटीबद्ध होतो का ?
  • भारतातील निधर्मीवादी हिंदू आतातरी जागे होऊन हिंदूंच्या आणि देशाच्या रक्षणासाठी कार्य करतील का ?
  • हिंदू जागे झाले, तर काय होईल, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे, त्यांचा आदर्श आता हिंदूंनी घ्यायला हवा, असेच धर्माभिमान्यांना वाटते !