राजकीय पक्षांची दु:स्थिती !

राजकीय पक्षांची दु:स्थिती !

‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

एकही मावळा तयार करू न शकणारे राजकीय पक्ष !

एकही मावळा तयार करू न शकणारे राजकीय पक्ष !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही मावळा तयार करू न शकणारे राजकीय पक्ष कधी हिंदवी स्वराज्य स्थापू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना स्‍थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा लाभ

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना स्‍थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’

संशोधन न करणारे म्हणे बुद्धीप्रामाण्यावादी !

संशोधन न करणारे म्हणे बुद्धीप्रामाण्यावादी !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे  शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे

मनातील विचार न्‍यून होण्‍यासाठी भावावस्‍थेत रहाणे आणि त्‍यांच्‍याकडे साक्षीभावाने पहाणे आवश्‍यक !

मनातील विचार न्‍यून होण्‍यासाठी भावावस्‍थेत रहाणे आणि त्‍यांच्‍याकडे साक्षीभावाने पहाणे आवश्‍यक !

‘तीव्र आध्‍यात्मिक त्रास असणार्‍यांच्‍या मनातील विचारांचे प्रमाण तीव्र असते. अशा वेळी ते विचार न्‍यून होण्‍यासाठी त्‍यांनी स्‍वयंसूचना घेतल्‍यास त्‍याचा उपयोग होत नाही. त्‍या विचारांतून बाहेर पडण्‍यासाठी साधकांची भावावस्‍थाच असावी लागते.

ईश्वरी कायदे आणि जमाखर्च यांचे महत्त्व !

ईश्वरी कायदे आणि जमाखर्च यांचे महत्त्व !

‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणाऱ्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हिंदुद्रोह !

हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणाऱ्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हिंदुद्रोह !

‘काही पंथीय पैसे देऊन किंवा धमकावून इतरांना आपल्या पंथात खेचतात. याउलट हिंदु धर्मात येतात ते त्यातील अद्वितीय शिकवणीमुळे ! असे असले, तरी बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मांध राष्ट्रहानी करत असल्यामागील कारण !

धर्मांध राष्ट्रहानी करत असल्यामागील कारण !

‘धर्मांधांमध्ये राष्ट्रप्रेमापेक्षा धर्मप्रेम अधिक असल्यामुळे ते धर्मासाठी कधीही आणि कितीही राष्ट्रहानी करतील’, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या आणि बहुसंख्य हिंदूंच्या लक्षात आले नाही’, हे त्यांना लज्जास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप !

ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप !

‘आजोबा, पणजोबा यांनी गुन्हा केला, तर नातवंडे, पतवंडे यांना शिक्षा करत नाहीत; मात्र काही ब्राह्मणद्वेष्टे काही पिढ्यांपूर्वी काही ब्राह्मणांनी केलेल्या कथित अपराधांची शिक्षा सर्वच ब्राह्मणांना करत आहेत. हे पाप होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे मूल्य !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे मूल्य !

‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले