विविध क्षेत्रांतील तज्ञ आणि संत यांच्यातील भेद !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. ‘प्रश्‍नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो’, असे म्हणतात.

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते.

देवाला न मानणारे हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण . . . इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंच्या सद्य:स्थितीचा आध्यात्मिक स्तरावर विचार करा !

‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्‍यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्‍यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाला मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने . . . असे वागला, तरच तो खर्‍या अर्थाने मानव असतो, नाहीतर तो केवळ मानवदेहधारी प्राणी असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी यांचा दुटप्पीपणा जाणा !

‘विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अनंत कोटी ब्रह्मांड सांभाळणार्‍या देवाप्रमाणे साधकांनीही समष्टी साधना म्हणून आश्रमातील सेवा किंवा संस्थेचे कार्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करायला हवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन …

क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव हिंदु धर्म !

. . . हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांच्या, क्रूरतेच्या, बलात्कारांच्या, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या सहस्रो नोंदी आहेत. फक्त अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दिशा नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी !

‘आंधळ्याचे ‘माझ्या पाठून या’ हे सांगणे ऐकणारे ज्याप्रमाणे त्याच्यामागून खड्ड्यात पडतात, तसे बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी यांचे आहे. ते दिशाहीनतेमुळे स्वतः खड्ड्यात पडतात आणि त्यांच्यामागून जाणारेही खड्ड्यात पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले