राष्ट्रभक्तासाठी राष्ट्र सर्वस्व, तर साधकासाठी परमात्मा !
‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कोणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पूर्वीचे राजे देवळे बांधायचे, तसेच देवळांना जमिनी आणि पैसे अर्पण करायचे. हल्लीचे शासनकर्ते रस्ता बांधणीच्या किंवा इतर एखाद्या नावाखाली देवळे जमीनदोस्त करतात, तसेच देवळांच्या जमिनी आणि पैसे लुबाडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करून गांधींच्या अहिंसेची प्रशंसा करणार्या हिंदूंची हलाखीची स्थिती झाली आहे. यात काय आश्चर्य ? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे आणि देशाचे भले व्हावे म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्यासंदर्भात ते काही करतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘दंगली, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी संकटांतून सरकार, पोलीस आणि लष्कर वाचवू शकणार नाहीत. केवळ ईश्वरच वाचवू शकतो. यासाठी तरी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘साधक निवडणुकीत जिंकले, तरी त्यांना स्वार्थ नसल्याने ते राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचार कधीच करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘यासंदर्भात विविध योगमार्गांप्रमाणे उत्तर देता येईल.
१. भक्तीयोग : विठोबा ‘केव्हा एकदा भक्त येईल आणि मी त्याला आलिंगन देईन’, याची वाट पहात उभा आहे.
२. कर्मयोग : विठोबा अकर्म-कर्म शिकवत आहे.
३. ज्ञानयोग : विठोबा साक्षीभावाने पहात आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
. . . याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले