राष्ट्रभक्तासाठी राष्ट्र सर्वस्व, तर साधकासाठी परमात्मा !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांचे नेते आणि देवाचे भक्त यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कोणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे देवळे लुबाडणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे  शासनकर्ते, तर कुठे देवळांची काळजी घेणारे पूर्वीचे राजे !

‘पूर्वीचे राजे देवळे बांधायचे, तसेच देवळांना जमिनी आणि पैसे अर्पण करायचे. हल्लीचे शासनकर्ते रस्ता बांधणीच्या किंवा इतर एखाद्या नावाखाली देवळे जमीनदोस्त करतात, तसेच देवळांच्या जमिनी आणि पैसे लुबाडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर ʻहिंदु राष्ट्रʼ हाच मार्ग !

‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करून गांधींच्या अहिंसेची प्रशंसा करणार्‍या हिंदूंची हलाखीची स्थिती झाली आहे. यात काय आश्चर्य ? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बहुतांश राजकीय पक्ष जनताद्रोही !

‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे आणि देशाचे भले व्हावे म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्यासंदर्भात ते काही करतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि त्यावरील उपाय

‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, स्वरक्षणार्थ तरी भग‍वंताची उपासना करा !

‘दंगली, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी संकटांतून सरकार, पोलीस आणि लष्कर वाचवू शकणार नाहीत. केवळ ईश्वरच वाचवू शकतो. यासाठी तरी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वार्थी राजकारणी आणि नि:स्वार्थी साधक !

‘साधक निवडणुकीत जिंकले, तरी त्यांना स्वार्थ नसल्याने ते राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचार कधीच करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा आहे ?

‘यासंदर्भात विविध योगमार्गांप्रमाणे उत्तर देता येईल.
१. भक्तीयोग : विठोबा ‘केव्हा एकदा भक्त येईल आणि मी त्याला आलिंगन देईन’, याची वाट पहात उभा आहे.
२. कर्मयोग : विठोबा अकर्म-कर्म शिकवत आहे.
३. ज्ञानयोग : विठोबा साक्षीभावाने पहात आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकून असणे

. . . याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले