‘एका प्रसंगात मला फार भीती वाटली. ‘भीती न्यून होऊन शिकता येऊ दे’, अशी देवाला प्रार्थना करतांना देवाने मला पुढील काव्य सुचवले.
१. भिऊ नकोस निकिता, शिकत रहा सतत ।
भिऊ नकोस निकिता, शिकत रहा सतत ।
अखंड प्रयत्न होण्यासाठी झटत रहा सतत ।। १ ।।
श्रद्धा ठेव गुरूंवर, सोडणार नाहीत ते अर्ध्या वाटेवर ।
वाट चुकलीस, तरी आणतील मार्गावर ।
शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जातील, तुला ते सत्वर ।। २ ।।
केवळ श्रद्धा ठेव । केवळ श्रद्धा ठेव ।। ३ ।।
२. भगवंता, शेवटपर्यंत तुझे बोट नाही रे सोडणार ।
वरील काव्य स्फुरल्यानंतर आतून आपोआप आलेले उत्तर पुढे दिले आहे.
देवा तुझे बोल अखंड स्मरणात रहावे । तुझ्या संकल्पास पात्र मी व्हावे ।। १ ।।
श्रद्धा ठेवीन अखंड माझ्या देवावर । भगवंता, शेवटपर्यंत तुझे बोट नाही रे सोडणार ।। २ ।।
– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.२.२०१४)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक