स्वार्थी राजकारण्यांपेक्षा सर्वस्वाचा त्याग करणारे श्रेष्ठ !

स्वार्थी राजकारण्यांपेक्षा सर्वस्वाचा त्याग करणारे श्रेष्ठ !

‘मला ‘हे हवे’, ‘ते हवे’, असे शासनकर्त्यांकडे मागणारे आणि ‘मला मत द्या’ असे जनतेकडे मागणारे राजकारणी देवाला आवडतील कि राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे देवाला आवडतील ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !

ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !

‘ईश्वरी राज्यात घरे, उद्याने, रस्ते इत्यादी सर्व ठिकाणची राजकारणी, विदेशी आणि अन्य धर्मीय यांची नावे पालटली जातील; कारण त्यांच्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. नवीन नावे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, संत आणि ऋषी-मुनी यांची असतील. त्यांच्या नावातील चैतन्याने जनतेचे भले होईल.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

भगवंताचे मानवी जीवनातील महत्त्व !

भगवंताचे मानवी जीवनातील महत्त्व !

‘देवाचे दास्यत्व हे मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी पदांपेक्षाही मोठे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्मविहीन ‍विध्वंसक विज्ञानावर साधना हेच उ‌त्तर !

अध्यात्मविहीन ‍विध्वंसक विज्ञानावर साधना हेच उ‌त्तर !

‘विज्ञानातील शोधांमुळे सर्व देश एकमेकांचा विध्वंस प्रभावीपणे करू शकतात. याउलट साधना शिकल्यामुळे सर्व देशांतील पुढच्या पिढ्यांतील नागरिकांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होईल. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धानंतर पृथ्वीवर सर्वत्र कुटुंबभावनाअसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वधर्मसमभाव : एक निरर्थक आणि निराधार संकल्पना !

सर्वधर्मसमभाव : एक निरर्थक आणि निराधार संकल्पना !

‘ज्याने ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द शोधला तो आणि हा शब्द मानणारे यांची कीव वाटते; कारण त्यांना ‘धर्म’ म्हणजे काय याची तोंडओळखही नसतांना त्यांनी हा शब्द प्रचलित केला आणि काही पिढ्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे पाप केले !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकमेवाद्वितीय सनातन प्रभात !

एकमेवाद्वितीय सनातन प्रभात !

‘सौ सुनार की एक लुहार की ।’, अशी हिंदीत एक म्हण आहे. तिचा अर्थ आहे, ‘सोनाराच्या १०० घावांनी जसे काम होते, तसे लोहाराच्या एका घावाने होते.’ तसेच सनातन प्रभात नियतकालिकांच्या संदर्भात आहे. सनातन प्रभातचे काही सहस्र वाचक जे राष्ट्र-धर्माचे कार्य करत आहेत, तसे लाखो वाचक असलेल्या दैनिकांचे वाचक करू शकत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकांचे दुष्परिणाम !

निवडणुकांचे दुष्परिणाम !

‘निवडणुका राजकारणी आणि जनता यांना स्वार्थ शिकवतात, तर साधना सर्वस्वाचा त्याग शिकवते. यामुळे भारतात पूर्वी निवडणुका नव्हत्या, तर सर्वजण साधना करायचे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगार होत !

एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगार होत !

भ्रष्टाचार्‍याची पत्नी आणि १८ वर्षे वयावरील मुले, नातेवाईक, ओळखीचे, कार्यालयातील सहकारी इत्यादींनाही भ्रष्टाचारी हा पगारापेक्षा अधिक पैसे कमवत असल्याची तक्रार न केल्याविषयी गुन्हेगाराचे साथीदार म्हणून आजन्म कारागृहात टाका ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पाश्चात्त्य आणि भारतीय संगीत अन् नृत्य

पाश्चात्त्य आणि भारतीय संगीत अन् नृत्य

‘पाश्चात्त्य देशांत गायन आणि नृत्य केवळ सुखासाठी करतात. याउलट भारतात संगीत आणि नृत्य साधनेचे प्रकार म्हणून ६४ कलांच्या अंतर्गत होते. त्यामुळे संगीत आणि नृत्य साधनेमध्ये ध्यानाप्रमाणे स्थिर न बसताही, म्हणजे गातांना आणि नृत्य करतांना ध्यान लागते ! भक्तीगीते गातांना किंवा समवेत नृत्य करतांना भावही जागृत होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे जागतिक केंद्र असलेल्या भारतासाठी हे लज्जास्पद !

अध्यात्माचे जागतिक केंद्र असलेल्या भारतासाठी हे लज्जास्पद !

‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले