राजकारणी आणि साधक यांमधील भेद !

‘राजकारणी सत्ता प्राप्त होईपर्यंत प्रयत्नरत असतात, तर साधक ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत प्रयत्नरत असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तथाकथित विचारवंतांनो, हिंदूंच्या देवतांच्या रूपांसंदर्भात विधाने करण्यापूर्वी त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घ्या !

‘अध्यात्मशास्त्राच्या ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबधित शक्ती एकत्रित असतात’, या सिद्धांतानुसार आणि देवतेच्या अवताराच्या कार्यानुरूप आवश्यक असे देवतेचे ते ते रूप तयार झालेले असते. हे लक्षात न घेताच हल्ली अनेक तथाकथीत विचारवंत हिंदूंच्या देवतांच्या विविध रूपां‍विषयी हास्यास्पद विधाने करत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिदूंना भारतातही कुणी विचारत नाही !

‘धर्मांध स्वधर्माच्या शिकवणीचे पालन करतात; म्हणून जगाला डोईजड झाले आहेत. याउलट हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विद्रोही हिंदूंमध्ये धर्माविषयी विकल्प निर्माण करून, फूट पाडून हिंदूंना दुबळे करतात. त्यामुळे हिंदूंना भारतातही कुणी विचारत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकांचा पोरखेळ !

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वामी विवेकानंद यांचे वेगळेपण !

‘कुठे बंगालमधील साम्यवादी आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे हल्लीचे हिंदू, तर कुठे बंगालमधीलच रामकृष्ण परमहंस यांचे हिंदु धर्माला जगात सर्वोच्च स्थान मिळवून देणारे शिष्य स्वामी विवेकानंद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे

भारताचे वेगळेपण !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले