गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

पू. संदीप आळशी

१. ‘गुरूंच्या वाणीत सामर्थ्य असते, हे निर्विवाद सत्य आहे; पण त्यांचे शब्द खरे ठरण्यासाठी त्यांच्यावर श्रद्धाही असावी लागते.

२. गुरूंना शिष्य किंवा साधक यांना जे शिकवायचे आहे, ते ‘ये हृदयीचे ते हृदयी’ होण्यासाठी शिष्य किंवा साधक यांचा गुरूंप्रती अनन्य भाव हवा.

३. ‘आपल्या अंतःकरणातील गुरुचरण’ हाच साधकांना सर्वांत मोठा आधार वाटायला हवा.

४. ‘गुरूंची सेवा सांगकाम्यासारखे नव्हे, तर ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ?’, हे जाणून करणारे गुरूंना अधिक आवडतात.’

– (पू.) संदीप आळशी (२७.५.२०२४)