वैज्ञानिक आणि संत !
वैज्ञानिक स्थुलातील गोष्टींचे संशोधन करतात, तर संत सूक्ष्मातील गोष्टी जाणतात आणि काही प्रसंगी त्यावर अधिकारही मिळवतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वैज्ञानिक स्थुलातील गोष्टींचे संशोधन करतात, तर संत सूक्ष्मातील गोष्टी जाणतात आणि काही प्रसंगी त्यावर अधिकारही मिळवतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुट्टी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले,
‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जगातील सर्वच महाविद्यालयांत आणि विश्वविद्यालयांत मायेतील विषयांचे शिक्षण दिले जाते. याउलट ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात’ १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमांतून ‘मायेतून मुक्ती कशी मिळवायची’, याचे शिक्षण देण्यात येणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१
अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्काळात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही (आध्यात्मिक) प्रगती होते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले