‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण !

‘त्याग करायला एक तरी दैनिक शिकवते का ? केवळ सनातन प्रभात शिकवते. त्यामुळे सनातन प्रभातच्या वाचकांची अध्यात्मात प्रगती होते, तर इतर दैनिकांचे वाचक मायेत अडकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हास्यास्पद सर्वधर्मसमभाव !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मायेतील शिक्षण आणि साधना यांतील भेद !

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?

ʻईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे !

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो !

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले