सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी सर्व अडचणी दूर कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

वारीत सहभागी होणार्‍या सर्व वारकर्‍यांना सोयी-सुविधा देण्यात राज्यशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलतीसाठी प्रवेशपत्र देण्याचे काम चालू !

आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला जाणार्‍या आणि येणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतच्या प्रवेशपत्राचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू आहे.

वारकर्‍यांना न्याय कधी ?

हिंदूबहुल देशात प्रत्येक वेळी अल्पसंख्यांक आणि त्यांच्या यात्रांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो आणि वारकरी मात्र उपेक्षित रहातात. भारतातील एकूणच व्यवस्था ‘सेक्युलर’ असल्यानेच असे होते. वारकर्‍यांसह हिंदूंच्या प्रत्येक यात्रेला न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

आषाढी वारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

आषाढी वारी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असून ऐतिहासिक वारसा जपणारी परंपरा आहे. यंदा २ वर्षांनंतर वारी होत असल्याने गर्दी पुष्कळ वाढली आहे.

सहस्रो वारकर्‍यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान !

कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे पायी पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. यंदा मात्र प्रत्यक्ष पायी सोहळा होत असल्याने वारकर्‍यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता !

वारकर्‍यांसाठीच्या ‘पंढरीची वारी’ या ‘ॲप’चे २१ जून या दिवशी होणार लोकार्पण !

वारकर्‍यांना गर्दीच्या काळात साहाय्य व्हावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रथमच ‘पंढरीची वारी’ हे भ्रमणभाषवरील ‘अ‍ॅप’ सिद्ध केले आहे. त्यावर वारीच्या काळात प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर येथे येणारे वारकरी यांना पुरवण्यात येणार्‍या सुविधांची माहिती मिळेल.

संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आणि मूर्ती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून या दिवशी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आणि मूर्ती यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान देहू येथे येणार असल्याची माहिती देहू संस्थानने दिली आहे

अंकली (बेळगाव) येथून टाळ मृदुंगाच्या गजरात हिरा-मोती अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान !

हे अश्व २० जून या दिवशी आळंदीत पोचणार आहेत. या अश्वप्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे, हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुंळुजकर, निवृत्ती चव्हाण, राहुल भोर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

वारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

गोहत्या, लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशी विविध संकटे आज हिंदु समाजावर घोंगावत आहेत. याविषयी प्रत्येक हिंदूला जागृत करणे आवश्यक आहे आणि ते सामर्थ्य वारकर्‍यांमध्ये आहे !