रात्रीची झोप पूर्ण होणे महत्त्वाचे !
काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्हणून दुपारी जेवल्यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्या दृष्टीने हानीकारक असते.