ज्यांनी धान गायब केले, त्यांना पकडण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल आणि ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी येथे दिली.

दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी धर्माचरण करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करा ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावे आणि गल्ल्या यांमध्ये डौलाने फडकला भगवा ध्वज !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला.

पारपत्र आणि व्हिसा सादर करण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे वारंवार गुन्हा करणार्‍या नायजेरियाच्या नागरिकांना बसली चपराक !

न्यायालयाच्या आदेशानंतर १० मासांनी एखाद्या गुन्ह्यात गजाआड झालेले  नायजेरियाचे ५४ नागरिक त्यांना जामीन मिळूनही अधिकृत कागदपत्रे नसल्याने अजूनही न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत आहेत.

भिवंडी येथे चोर्‍या करणारी टोळी अटकेत !

चोर्‍या करणाऱ्या टोळीकडून ८ लाख १७ सहस्र ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून १६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प करूया ! – सुधीर मुनगंटीवार, वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

२ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्ताने वर्धा येथे ‘वन्दे मातरम् ।’ अभियान आणि नदी महोत्सव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

पाण्यासाठी योजना राबवण्यात मनापासून प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस ! – डॉ. राजेंद्रसिंह राणा, विख्यात पर्यावरणतज्ञ

जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. ७५ नद्यांच्या परिक्रमा उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोलतांना डॉ. सिंह यांनी फडणवीसांच्या कामाची प्रशंसा केली.

गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार  

विलंबाने घेतलेला निर्णय असला, तरी ‘हेही नसे थोडके !’

मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन एका युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून घराजवळ आरोग्य सुविधा देण्यात येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्याची ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी आरोग्यक्षेत्रासाठी दुप्पट निधी देण्यात येईल