ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी फलक (बॅनर) लावले असतांनाच, त्यापाठोपाठ २५ जूनला सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात शिवसैनिकांचा मोर्चा !

‘शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है’, यांसह अन्य घोषणा देत शिवसैनिकांनी २४ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश !

या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. यावर त्यांना उत्तर देण्यासाठी ४८ घंट्यांची समयमर्यादा देण्यात आली असून उत्तर न दिल्यास आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील कार्यालय फोडले  

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे येथील कँप २ भागातील मध्यवर्ती कार्यालय २५ जून या दिवशी दुपारी फोडण्यात आले.

गौहत्ती येथे बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखो रुपयांचा व्यय !

‘रॅडिसन ब्लू’ उपाहारगृहात रहाणार्‍या आमदारांचा खाण्यावर प्रतिदिन ८ लाख रुपयांचा व्यय होतो, तर दुसरीकडे आसाममधील लोकांना पूर साहाय्य निधीच्या नावाखाली केवळ २ वाट्या तांदूळ आणि १ वाटी डाळ वाटली जात आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! – खासदार नवनीत राणा

सत्ता दूर जातांना पाहून सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे. सत्तेचा दुरुपयोग वाढला आहे. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या खर्‍या शिवसैनिकांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.

मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थाने-शाखा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवसेना म्हणजे निखारा असून त्यावर पाय ठेवला, तर जाळून टाकू ! – मुख्यमंत्री

‘बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे अधिक प्रेम आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी उपस्थितांनी ‘गद्दारांना परत घेऊ नका’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांना परत घेणारच नाही.’’

आजही आम्ही शिवसेनेतच आणि आमचा गट हाच अधिकृत ! – दीपक केसरकर, प्रवक्ते, एकनाथ शिंदे गट

शिवसेना पक्षप्रमुखांकडे केवळ १६ ते १७ आमदार असून आमच्याच गटाकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मागण्या घेऊन आम्ही वारंवार पक्षप्रमुखांकडे गेलो; मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा गट स्थापन करणे भाग पडले.