सिंधुदुर्ग : सासोली ग्रामस्थांच्या भूमी लाटण्याचा बांधकाम व्यावसायिकाचा प्रयत्न उघड !

‘या प्रकाराची तात्काळ नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे ! – अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ पहा)

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणार्‍यांनी स्वतःची पात्रता ओळखून घ्यावी ! – शिवाजीराव पाटील, माजी खासदार

स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाविषयी प्रेम नाही. सावरकरांवर टीका करणार्‍यांनी आधी त्यांची पात्रता ओळखून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.

अंबरनाथ येथील ग्रंथाभिसरण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

‘ज्ञानदीप’ संस्थेकडून ग्रंथालयास विविध उपक्रमांची आकस्मित भेट !

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने !

अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांनाही उंचगावमधील वीज वितरण शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी मार्चचे कारण सांगून वीजवसुली करतांना त्यांची वीज बंद करत होते.

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या  जयघोषाने दुमदुमली सावंतवाडी !

‘‘यात्रेत हिंदूंनी दाखवलेला सहभाग विरोधक आणि सावरकर यांच्यावर टीका करणार्‍यांना एक प्रकारे चपराक आहे. त्यामुळे यापुढे कुणीही स्वा. सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द काढण्याचे धाडस करणार नाही.’’

पिंपरी-चिंचवडमध्ये (पुणे) ‘आम्ही सारे सावरकर’ फ्लेक्सची चर्चा !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वा. सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आणि स्वा. सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम चालू करण्यात आली आहे.

पालघर येथील साधूंच्या हत्येचे अन्वेषण ‘सीबीआय’कडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती !

पालघर येथील साधूंच्या निर्घृण हत्येचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआय) देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ एप्रिल या दिवशी होणार आहे.

उद्धव ठाकरे गट सध्‍या तरी ‘मशाल’ चिन्‍ह वापरू शकणार !

उद्धव ठाकरे गटाला २७ मार्च या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयातून पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्‍ह म्‍हणून वापरण्‍याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्‍हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे.

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारणार्‍या सदस्यांना निलंबित करण्यासाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांतील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घातला.