वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

साधनेचे महत्त्व

‘राजकीय पक्ष  ‘हे  देऊ,  ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.’

राष्ट्राच्या परमावधीच्या अधोगतीचे कारण

 ‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणाऱ्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली  आहे.’

हिंदु राष्ट्रातील शिक्षणपद्धतीत प्रत्येक विषयाच्या अभ्यासासह ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल !

‘हिंदु (ईश्वरी) राष्ट्रात ‘नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कृतींसाठी प्रोत्साहन देते.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’