पुण्यातील १ सहस्र ३८५ ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक !
संमत निधीचा विकासकामांसाठी वापर होत नसेल, तर निधी का घेण्यात येत आहे ? यासाठी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे.
संमत निधीचा विकासकामांसाठी वापर होत नसेल, तर निधी का घेण्यात येत आहे ? यासाठी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे.
फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा पालिकेने भक्तांना वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन दिल्यास श्री गणेशाची कृपा होईल !
जिल्ह्यातील ५३ विनापरवाना शाळांपैकी ३७ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ४ शाळांच्या विरोधात शिक्षण विभागाने तक्रार प्रविष्ट केली असून शाळा बंद करण्याचे पत्र (नोटीस) पाठवले आहे. १६ शाळा अनधिकृत असून त्यांना ‘शाळा बंद’ करण्याचे पत्र पाठवले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सहा वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी आहे; मात्र ही बंदी कायमस्वरूपी घातली जावी, याविषयीचा निवडणूक सुधारणेतील प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे, असे माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी सांगितले.
कोंढव्यातील शाळेच्या मालमत्तेवरून दोन प्राचार्य आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात वाद चालू आहे. सकाळी शिक्षिका शाळेत जात असतांना जुबेर याने त्यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, तसेच इतरांनी ‘शाळेत जायचे नाही, नाहीतर आम्ही तुला मारणार’, अशी धमकी दिली.
प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्या मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले. येथे संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर अधिवक्त्या मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
वीररत्न बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे, वीर शिवा काशीद आणि बांदल सेनेच्या ३६३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पावनखिंड (कोल्हापूर) ते भोर तालुक्यातील कसबे शिंद गाव असे २५० कि.मी. ज्योत आणून हे अभिवादन केले.
जलतरण तलावांचे दर १० रुपयांवरून २० रुपये केले आहेत. मासिक परवान्याचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे महापालिकेला दुप्पट उत्पन्न मिळत आहे. तरीही महापालिकेच्या वतीने जलतरणांचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
३ वेळा कार्यक्रमाचा दिनांक पालटूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहू न शकल्याने पुरंदर जिल्ह्यातील जेजुरी येथे १३ जुलै या दिवशीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
भ्रष्ट अधिकार्यांना कशाचाच धाक उरला नाही, हेच यावरुन सिद्ध होते. देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !