पाकिस्तानचा ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये समावेश झाल्यानंतर भारतातील आतंकवादी आक्रमणाचे प्रमाण अल्प झाले ! – भारत
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ (एफ्.ए.टी.एफ्.) या संस्थेच्या ‘करड्या सूची’मध्ये (‘ग्रे लिस्ट’मध्ये) पाकिस्तानचा समावेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणांचे प्रमाण अल्प झाले आहे, अशी माहिती भारत सरकारचे संयुक्त राष्ट्रांतील संयुक्त सचिव सफी रिझवी यांनी दिली.