चीनने सहस्रो कि.मी. भूमी हिसकावली, तरी पंतप्रधान एक इंचही भूमी गेली नसल्याचा दावा करतात ! – राहुल गांधी
वर्ष १९६२ च्या युद्धात चीनने भारताची ३८ सहस्र चौरस किलोमीटर भूमी बळकावली. यावर राहुल गांधी यांचे पणजोबा आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी संसदेत, ‘जेथे गवताची पातीही उगवत नाहीत, अशीच भूमी चीनने बळकावली आहे’, असे म्हणत याचे समर्थन केले होते.