लाचखोर अधिकारी पुन्हा कार्यरत होतात, यासाठी कायद्यात पालट करण्याविषयी अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना ९ मासानंतर पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त केले जाते. त्याच पदावर येऊन ते पुन्हा अपहार करतात.

‘मोबाईल गेमिंग’च्या माध्यमातून धर्मांतर, भारताच्या सुरक्षेला धोका ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सीमा हैदर ‘ऑनलाईन’ ओळखीतूनच भारतात आली. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या धोका निर्माण झाला असून यातून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

अनाथ मुलांना उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये सामावून घेऊ ! – आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला-मुलींना शासकीय नोकरीमध्ये १ टक्का आरक्षण दिलेले आहे. त्यांना नोकरीसाठी अनेक सवलतीही देण्यात आलेल्या आहेत, तसेच त्यांना सर्व उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ॲागस्टपर्यंत चालू रहाणार ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

२ आणि ३ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि ४ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाजांचे ठराव होणार आहेत.

महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० वरून ५०० झाली ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वाघांची संख्या वाढत चालल्याने ‘वाघ घेता का वाघ ?’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पिंजर्‍यातही वाघ आणि बिबटे यांची संख्याही प्रचंड वाढली आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी विधान परिषदेत केले.

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

ही प्रकरणे वर्ष २००७ पासूनची आहेत. यांतील ४० पैकी ३३ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आणखी ५ जणांवर लवकरच आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अनधिकृत तुकड्यांना मान्यता देणे, चुकीचे शालार्थ ‘आयडी’ देणे आदी प्रकार या प्रकरणात झाले आहेत.

‘कोचिंग क्लास’ घेणार्‍या अनेकांनी शाळांच्या मान्यता घेतल्या आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लोकप्रतिनिधींनी राज्यात ‘कोचिंग क्लास’चे पेव फुटले आहे. शाळा चालू असतांना कोचिंग क्लास घेण्यात येतात. त्यामुळे शाळा ओस पडत असल्याचे सभागृहात सांगितले.

सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !

रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.

तुळजापूर मंदिरातील गहाळ दागिन्यांची सरकारने त्वरित चौकशी करावी ! – आमदार मंदा म्हात्रे, भाजप

महाराष्ट्राची कुलदेवता तुळजापूर मंदिरतील भवानीदेवीचे पुरातन दागिने आणि वस्तू गहाळ झाल्या आहेत. हे दागिने पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आदेश द्यावा.

महाराष्ट्रात ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे चालणार्‍या जुगारावर बंदी घालावी ! – आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस

बहुतांश ‘ऑनलाईन’ खेळ हे पैसे लावून खेळले जातात. हा एक प्रकारे अधिकृत करण्यात आलेला जुगारच नव्हे का ? ‘ऑनलाईन’ खेळांचा अपलाभ धर्मांध, तसेच अन्य गुन्हेगार घेत आहेत.