मीरा-भाईंदर आणि ठाणे भागात मोठ्या प्रमाणात भू माफिया निर्माण झाले आहेत ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी मीरा-भाईंदर येथील गुंड प्रवृत्तीचे श्यामसुंदर अग्रवाल यांनी अनेक शेतकर्‍यांना फसवून त्यांची भूमी हडप केली असल्याचा गंभीर प्रकार सभागृहात लक्षात आणून त्यांना अटक करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र : विधानभवनातील गैरसोय, अस्वच्छता आणि प्रवेश ओळखपत्र या संदर्भात सदस्यांकडून अप्रसन्नता !

आमदारांना प्रवेश ओळखपत्र मिळत नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र मिळत नाहीत, उपाहारगृहात बसण्यासाठी जागा मिळत नाही, स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत, तिथे पाण्याचे नळ वहात असतात, अशा त्रुटी सदस्यांनी विधान परिषदेत मांडल्या.

‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजनाद्वारे अतीदुर्गम भागातील रुग्णांना सेवा दिली जात आहे ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

अतीदुर्गम भागांमध्ये रुग्णांना ‘टेलिमेडिसन’च्या माध्यमातून सेवा दिली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारने आयुष्यमान योजनेअंतर्गत ‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजना आणली. त्यानुसार अतीदुर्गम किंवा दूरच्या भागांमध्ये रुग्णांना सेवा दिली जात आहे.

महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीचे दायित्व राज्यशासन उचलेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यशासन महिलांसाठी ९९ हून अधिक योजना आणणार आहे. राज्यात एकूण ५४ सहस्र महिला बचत गट आहेत. यामध्ये ६० लाख महिला जोडलेल्या आहेत. या सर्व बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘युनिटी मॉल’ ही संकल्पना शासन राबवणार आहे.

‘कोरोना’च्या काळात पालकांचे निधन झालेल्या मुलांना ‘बालसंगोपन योजने’चा लाभ देण्यात येत आहे ! – आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

कोरोना महामारीच्या काळात एक किंवा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या मुलांना ‘बाल संगोपन योजने’चा लाभ देण्यात येत आहे. मार्च २०२३ पर्यंत लाभाची संपूर्ण रक्कम मुलांना देण्यात आली आहे.

कर्जत येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे काम चालू करू ! – उदय सामंत, उद्येागमंत्री  

आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड औद्योगिक वसाहतीची अधिसूचना वर्ष १९९६ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यावर कोणताही उद्योग उभारला गेला नाही, हे खरे आहे; परंतु त्याविषयी लवकरच प्रयत्न चालू करू.

यापुढे १० कोटी रुपयांपर्यंतचे खटले मुंबई शहर दिवाणी न्यायालयात लढवता येणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभेत २८ जुलै या दिवशी ‘मुंबई शहर दिवाणी न्यायालय (सुधारणा) विधेयक २०२३’ संमत करण्यात आले. यापूर्वी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात १ कोटी रुपयांपर्यंतचे खटले लढवण्यात येत होते.

राज्यातील २० सहस्र शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नाही ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यात जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अशा एकूण १ लाख ९ सहस्र ६०५ शाळांची नोंद आहे. यांतील ८९ सहस्र ५६० शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. उर्वतिर २० सहस्र ४५ शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्याची सूचना देण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्रात उद्योजकांची गुंतवणूक सुलभ आणि कालमर्यादेत होण्यासाठी ‘महाराष्ट्र उद्योग-व्यापार व गुंतवणूक सुविधा अध्यादेश’ संमत !

राज्यात देशातून आणि परदेशातून उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी येतात. या उद्योजकांना कालमर्यादेत विविध विभागांच्या अनुमती मिळत नाहीत. त्यामुळे काही उद्योजक परतही जातात.

विधानसभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या अटकेची विरोधकांची मागणी !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. या वेळी विरोधकांतील काहींनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांना फासावर चढवण्याची मागणी केली.