बालगृहांच्या पडताळणीसाठी कृती दलाची स्थापना करावी ! – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री

महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जळगाव येथील वसतीगृहातील ५ अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने महिला आणि विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या.

सोलापूर जिल्ह्यातील पीक विमा आस्थापनांचे ऑडिट करावे ! – राम सातपुते, आमदार, भाजप

शेतकरी बांधव कष्टाने पीक विम्याचा हप्ता भरतो; मात्र विमा आस्थापने शेतकर्‍यांना फसवतात. सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ३ वर्षांत विम्यासाठी भरलेल्या पैशांचे लेखा परीक्षण करून आस्थापनांवर कारवाई करणार का ?

विधानभवनात मनासारखे दालन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याचा कार्यालयावर बहिष्कार !

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे डॉ. गावित यांनी लेखी तक्रारही केल्याचे समजते; मात्र त्याची अध्यक्ष नार्वेकर यांनी अद्याप नोंद घेतली नाही.

आतंकवाद्याकडे कुलाबा येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या ‘छाबड हाऊस’ची छायाचित्रे सापडली !

सध्या हे दोघे आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ५ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित केले आहे. दोन्ही आरोपी ‘अल् सुफा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.

समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणारा ‘जादूटोणाविरोधी कायदा’ रहित करा !

एड्स, कर्करोग यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची फसवणूक करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमावर गुन्हा नोंद करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा नोंद केला, यातूनच यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो !

कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कलमामध्ये ३ मासांत सुधारणा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सरकारी कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कायद्याचा वापर कर्मचार्‍यांकडून शस्त्र म्हणून केला जात आहे. सामान्य माणसांची पिळवणूक केली जात असून हे कलम त्वरित रहित करावे, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली.

विधान परिषदेत भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी कागद फाडले !

विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी सदस्यांना साधारणतः ८ ते १० मिनिटे दिली जातात; परंतु गोपीचंद पडळकर १३ मिनिटे बोलत होते. उपसभापतींनी ३ वेळा सूचना देऊनही पडळकर थांबत नव्हते, त्यामुळे . . .

अहिल्‍यानगर येथे मुसलमान महिलेकडून हिंदु मुलींच्‍या धर्मांतराचा प्रयत्न !

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील राहुरी तालुक्‍यातील उंबरे गावात एक मुसलमान महिला हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती उघड करणार्‍या हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून पोलिसांनी त्‍यांच्‍या विरोधात खोटे गुन्‍हे नोंदवले आहेत, असे गंभीर सूत्र भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी औचित्‍याच्‍या सूत्राद्वारे २८ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्‍थित केले.

कोल्हापूरमधील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या कामात कोट्यवधीचा घोटाळा करणारे अधिकारी निवृत्त !

या प्रकरणी दूधगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले जाईल, तसेच जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे एका मासाच्या आत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मीरा-भाईंदर आणि ठाणे भागात मोठ्या प्रमाणात भू माफिया निर्माण झाले आहेत ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी मीरा-भाईंदर येथील गुंड प्रवृत्तीचे श्यामसुंदर अग्रवाल यांनी अनेक शेतकर्‍यांना फसवून त्यांची भूमी हडप केली असल्याचा गंभीर प्रकार सभागृहात लक्षात आणून त्यांना अटक करण्याची मागणी केली.