पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची ! – प.पू. मोहन भागवत, सरसंघचालक

पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार विसरता कामा नये. स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि आवश्यकतेच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, असे आवाहन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले.

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्र प्रत्यक्षात आणणार ! – प.पू. सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्राची निर्मिती नक्कीच करील, अशी हिंदु समाजाची भावना आहे. हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे, हे सत्य आहे. संघ हे नक्की करील, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.

सांस्कृतिक शक्ती आणि क्षमता यांच्या बळावर भारत जगासाठी आशेचा किरण बनण्यास सक्षम !

भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.

वेदरक्षणाच्या परंपरेच्या विस्ताराची आवश्यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्‍या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे.

प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते ठाणे येथील कर्करोग रुग्‍णालयाचा पायाभरणी सोहळा !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पांपैकी एक असलेला येथील कर्करोग रुग्‍णालयाचा पायाभरणी सोहळा प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते भूमीपूजन करून पार पडला.

देशातील सर्व मंदिरांचे एकत्रीकरण देशाला समृद्ध बनवू शकते ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याची मागणी या महासंमेलनातून केली पाहिजे, तसेच प्रत्येक मंदिरांत हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे !

समर्थांसाठी श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

श्रीसमर्थवाग्‍देवता मंदिर, धुळे या संस्‍थेच्‍या वतीने ‘श्रीसमर्थ रामदासस्‍वामी लिखित वाल्‍मिकी रामायण’ या ग्रंथाच्‍या मूळ सात बाडांचे कांडशः संपादन करून बनवण्‍यात आलेल्‍या ८ खंडांचे राष्‍ट्रार्पण सरसंघचालकांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते.

भारतातील इस्लाम सर्वांत सुरक्षित ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे !