प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे देहूतील (जिल्हा पुणे) सांडपाणी प्रकल्पाचे काम अनेक मासांपासून बंद !
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात देहूसाठी ३१ कोटी रुपयांचा सांडपाणी आणि मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला; मात्र हा प्रकल्प गेले अनेक मास बंद आहे. त्यामुळे ३ गावांतील सांडपाणी सरळ इंद्रायणीच्या पाण्यात मिसळत आहे.